U19 Asia Cup : १३ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, सेमी फायनलमध्ये ठोकले ५ षटकार, टीम इंडिया फायनलमध्ये
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U19 Asia Cup : १३ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, सेमी फायनलमध्ये ठोकले ५ षटकार, टीम इंडिया फायनलमध्ये

U19 Asia Cup : १३ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, सेमी फायनलमध्ये ठोकले ५ षटकार, टीम इंडिया फायनलमध्ये

Dec 06, 2024 04:01 PM IST

Ind vs Sl U19 Semi Final : टीम इंडिया अंडर १९ आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला.

U19 Asia Cup : १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी पुन्हा तळपला, सेमी फायनलमध्ये ठोकले ५ षटकार, टीम इंडिया फायनलमध्ये
U19 Asia Cup : १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी पुन्हा तळपला, सेमी फायनलमध्ये ठोकले ५ षटकार, टीम इंडिया फायनलमध्ये

Sri Lanka U19 vs India U19 Semi final scorecard : टीम इंडिया अंडर १९ आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या ACC पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा पराभव केला. 

भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव करत फायनल गाठली. भारताच्या या शानदार विजयात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

वैभवने अवघ्या ३६ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४६.२ षटकांत १७३ धावांवर गडगडला. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली.

सलामीवीर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी झाली. आयुष म्हात्रे ९व्या षटकात ३४ धावा काढून बाद झाला. यानंतर वैभव सूर्यवंशीने १०व्या षटकात आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाची धावसंख्या १० षटकात १०० च्या पुढे गेली होती.

वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्ममध्ये

वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता पण १४व्या षटकात तो प्रवीण मनीषाचा बळी ठरला. यानंतर कर्णधार मोहम्मद अम्मान आणि सिद्धार्थ सी यांनी आघाडी घेत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

विजयापूर्वी सिद्धार्थ आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, मात्र कार्तिकेयसह कर्णधाराने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह, भारतीय संघ ९व्यांदा अंडर १९ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे ते ९व्यांदा विजेतेपदावर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल.

यानंतर आता अंडर १९ आशिया कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याशी होईल. या सामन्याचा निकाल येईपर्यंत बांगलादेश संघाने १५ षटकात २ गडी गमावून ७६ धावा केल्या होत्या. संघाला विजयासाठी ३५ षटकात ४१ धावांची गरज होती. अशा स्थितीत फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होईल असे दिसते आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या