भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता, पण दुसऱ्या दिवशी (१७ ऑक्टोबर) किवी गोलंदाजांनी संपूर्ण भारतीय संघ ४६ धावांवर गारद केला.
बेंगळुरू कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ३ बाद १८० धावा केल्या होत्या. त्यांची एकूण आघाडी १३४ धावांवर पोहोचली होती. आता आज तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला असून त्यांची आघाडी १५० धावांच्या पुढे गेली. त्यामुळे टीम इंडिया पहिला कसोटी सामना जिंकू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपली रणनीती स्पष्ट केली होती. भारतीय संघ १०० धावांत सर्वबाज झाला तरी तरी आक्रमक क्रिकेट खेळणे थांबवणार नाही, असे गंभीर म्हणाला होता.
त्याच्या मते, संघ १०० धावांवर जरी ऑलआऊट झाला तरी भारताची गोलंदाजी त्यानुसार परिस्थिती हाताळेल. याचा अर्थ गंभीरची लढाऊ रणनीती मैदानाबाहेरूनही सामन्याचा मार्ग बदलण्यास सक्षम आहे. प्रशिक्षकाव्यतिरिक्त, रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली आक्रमक फलंदाजी करण्याबरोबरच आक्रमक पद्धतीने संघाचे नेतृत्वही करत आहे.
कानपूरमध्ये झालेल्या भारत-बांगलादेश कसोटी सामन्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या सामन्याचे तीन पावासमुळे वाया गेले होते. पण भारताने दोन दिवसात सामना जिंकला होता. इंग्लंडच्या 'बॅझबॉल' क्रिकेटचा मोठा गाजावाजा आहे. पण भारताच्या त्या सामन्यातील खेळाने आणखी आक्रमकता दाखवली.
या शानदार खेळाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला होता. अशा स्थितीत टीम इंडियाने अशाच मानसिकतेने क्रिकेट खेळले तर ते न्यूझीलंडला सहज पराभूत करू शकतात.
सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय संघात विकेट घेणारे गोलंदाज भरपूर आहेत. जसप्रीत बुमराह कोणत्याही क्षणी सामन्याचा मार्ग बदलण्यास सक्षम आहे.
तसेच, रविचंद्रन अश्विनचा ५०० हून अधिक कसोटी बळींचा अनुभव अजूनही टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो. त्याचवेळी रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्यात माहीर आहे.
संबंधित बातम्या