IND vs SA : चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार, भारत-आफ्रिका चौथ्या सामन्याची वेळ जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार, भारत-आफ्रिका चौथ्या सामन्याची वेळ जाणून घ्या

IND vs SA : चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार, भारत-आफ्रिका चौथ्या सामन्याची वेळ जाणून घ्या

Updated Nov 15, 2024 11:10 AM IST

IND vs SA 4th T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चौथा टी-20 सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने मालिकेत २-१ आघाडी घेतली आहे आणि आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

IND vs SA : चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार, भारत-आफ्रिका चौथ्या सामन्याची वेळ जाणून घ्या
IND vs SA : चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार, भारत-आफ्रिका चौथ्या सामन्याची वेळ जाणून घ्या (AFP)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (१५ नोव्हेंबर) चौथा आणि अखेरचा टी-20 सामना खेळला जाणार आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सूर्या ब्रिगेड शुक्रवारी झेंडा जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. 

वांडरर्स स्टेडियम पीच रिपोर्ट वांडरर्स

वांडरर्स स्टेडियममधील खेळपट्टी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी नंदनवन आहे. हे एक हाय स्कोरिंग मैदान आहे, जिथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १७४ आहे. जोहान्सबर्गने आतापर्यंत ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून संघाची सर्वोच्च धावसंख्या २६०/६ आहे, जी श्रीलंकेने २००७ मध्ये केनियाविरुद्ध केली होती.

जोहान्सबर्गमध्ये नाणेफेक झाल्याने फारसा फरक पडत नाही, कारण प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २६ पैकी १३ सामने जिंकले आहेत. २०२३ मध्ये जेव्हा भारत येथे शेवटचा टी-20 सामना खेळला तेव्हा फिरकीपटू कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या होत्या.

सामन्याची वेळ

मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरु झाला पण दुसरा सामना १ तास आधी सुरु झाला. यानंतर पुन्हा एकदा तिसरा सामना रात्री ८.३० वाजता सुरू झाला. दुसरा सामना सोडला तर पहिला आणि तिसरा सामना खूप उशिरा संपला.

दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर संपले त्यामुळे चाहत्यांना बराच वेळ जागे राहावे लागले. आता चौथ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यावेळीही चाहत्यांना रात्री १२:३० वाजेपर्यंत जागे राहावे लागू शकते.  गेल्या सामन्याप्रमाणेच चौथा T20I सामनाही रात्री ८.३० वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच रात्री ८ वाजता होईल.

प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार?

या मालिकेत भारताने आतापर्यंत पहिल्या तीन सामन्यांमध्ये आपल्या १५ पैकी १२ खेळाडूंना आजमावले आहे आणि आता वेगवान गोलंदाज यश दयाल किंवा विशाख विजयकुमार यांना पहिली संधी मिळते की नाही हे पाहायचे आहे. मात्र, कर्णधार सूर्या विजयी संयोजन कायम राखून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या