Ind vs Nz : न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव, वरुण चक्रवर्तीचे ५ विकेट, सेमी फायनलमध्ये टीम इंडिया या संघाला भिडणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Nz : न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव, वरुण चक्रवर्तीचे ५ विकेट, सेमी फायनलमध्ये टीम इंडिया या संघाला भिडणार

Ind vs Nz : न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव, वरुण चक्रवर्तीचे ५ विकेट, सेमी फायनलमध्ये टीम इंडिया या संघाला भिडणार

Published Mar 02, 2025 09:47 PM IST

Ind vs Nz Match Highlights : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी धुव्वा उडवला. आता सेमी फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव, वरुण चक्रवर्तीचे ५ विकेट, सेमी फायनलमध्ये टीम इंडिया या संघाला भिडणार
न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव, वरुण चक्रवर्तीचे ५ विकेट, सेमी फायनलमध्ये टीम इंडिया या संघाला भिडणार (PTI)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी धुव्वा उडवला. आता सेमी फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.  

दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना २४९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या ७९ धावांच्या खेळीचे महत्त्वपूर्ण योगदान होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला ४५.३ षटकात केवळ २०५ धावा करता आल्या. केन विल्यमसनने ८१ धावांची खेळी खेळली, पण तो आपल्या संघाचा विजय निश्चित करू शकला नाही.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने रचिन रवींद्रची विकेट स्वस्तात गमावली. रवींद्र (६) हार्दिक पंड्याकरवी अक्षर पटेलच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर विल यंग (२२) हाही वरुण चक्रवर्तीने बोल्ड झाला. यासह न्यूझीलंडची धावसंख्या २ गडी बाद ४९ अशी झाली.

चायनामन कुलदीप यादवने डॅरिल मिशेलचा डाव संपवला. त्यानंतर रवींद्र जडेजाने टॉम लॅथमला (१४ ) LBW बाद करून भारतीय संघाला चौथी विकेट मिळवून दिली. मात्र, या सगळ्यात केन विल्यमसनने क्रीझवर राहून ७७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, तत्पूर्वी, भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाली. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा ३०० वा एकदिवसीय सामना होता, ज्यामध्ये तो जबरदस्त टचमध्ये दिसत होता. पण ग्लेन फिलिप्सने असा जादुई झेल घेतला की मैदानातले सगळेच अवाक् झाले. विराटने ११ धावा केल्या. 

पण संकटाच्या परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी टीम इंडियाची धुरा सांभाळली, ज्यांच्यामध्ये ९८ धावांची भागीदारी झाली. अय्यरने ७९ धावा केल्या, तर अक्षर पटेलने ४२ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्यानेही ४५ धावांची खेळी करत भारताला २४९ धावांपर्यंत मजल मारली.

वरुण चक्रवर्तीची जादूई फिरकी

भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा श्रेयस अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांचा होता. दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम श्रेयस अय्यरने ७९ धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ५ विकेट घेत किवींना खूप त्रास दिला. चक्रवर्तीचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पदार्पणाचा सामना होता. ज्यामध्ये त्याने पंजा घेऊन इतिहास रचला आहे. चॅम्पियन्स पदार्पणाच्या सामन्यात ५ बळी घेणारा वरुण पहिला भारतीय गोलंदाज आहे.

भारत अ गटात अव्वल

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात आपले तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडियाने यापूर्वी बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा ६-६ विकेट्सच्या फरकाने पराभव केला होता. आता न्यूझीलंडचाही ४४ धावांनी पराभव झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुबई क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आता भारतीय संघाला ४ मार्चला दुबईतच उपांत्य फेरी खेळायची आहे. हा सामना गट-ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियन संघाशी होईल. तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या