IND vs ENG Semi Final : कमीत कमी किती षटकांचा सामना होऊ शकतो? ICC चा 'नियम २५० मिनिट' नेमका आहे तरी काय? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Semi Final : कमीत कमी किती षटकांचा सामना होऊ शकतो? ICC चा 'नियम २५० मिनिट' नेमका आहे तरी काय? वाचा

IND vs ENG Semi Final : कमीत कमी किती षटकांचा सामना होऊ शकतो? ICC चा 'नियम २५० मिनिट' नेमका आहे तरी काय? वाचा

Published Jun 27, 2024 08:04 PM IST

IND vs ENG Toss Update : गयानामध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. आयसीसीने दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवला नाही. पण या सामन्यासाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला आहे

IND vs ENG Semi Final : कमीत कमी किती षटकांचा सामना होऊ शकतो? आयसीसीचा २५० नियम नेमका आहे तरी काय? वाचा
IND vs ENG Semi Final : कमीत कमी किती षटकांचा सामना होऊ शकतो? आयसीसीचा २५० नियम नेमका आहे तरी काय? वाचा (X)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना (२७ जून) गयाना येथे खेळवला जाणार आहे, परंतु पावसामुळे अद्याप टॉस झाला नाही. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एका ट्विटद्वारे भारत-इंग्लंड सामन्याच्या नाणेफेकीला उशीर होणार असल्याची खात्री केली आहे.

पण काही वेळापूर्वीच पाऊस थांबला आणि आकाश स्वच्छ असल्याची बातमीही आली आहे. पण टॉसच्या काही वेळापूर्वीच प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला होता. या सामन्यातील विजेता संघ सामना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. आफ्रिकेने T20 विश्वचषक २०२४ च्या पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ विकेट्सने पराभव केला होता.

२५० मिनिटांचा नियम

आयसीसीने दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवला नाही. पण या सामन्यासाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला आहे. म्हणजेच पाऊस किंवा अन्य कारणामुळे सामना उशिरा सुरू झाला तर २५० मिनिटांचा नियम लागू केला जाईल. याअंतर्गत सामन्यासाठी दिलेला वेळ जरी पूर्ण झाला तरी २५० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

भारत-इंग्लंड सेमी फायनलसाठी राखीव दिवस नाही

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयाना येथे होणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. नाणेफेकीपूर्वी पाऊस पडल्यास सामना लांबणीवर पडू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये फक्त एका दिवसाचं अंतर आहे. या कारणास्तव यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.

षटकं कमी करण्यास कधी सुरू होईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी बराच अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. पाऊस सतत पडत राहिल्यास आणि तो थांबला नाही तर १२.१० नंतर षटके कमी करण्यास सुरुवात होईल.

१०-१० षटकांच्या सामन्यांसाठीही कटऑफ वेळ निश्चित

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाऊस पडल्यास १०-१० षटकांचा सामनाही खेळवला जाऊ शकतो. यासाठी रात्री ०१.४४ वाजता कट ऑफची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे नियमही घालून दिले आहेत.

सामना झाला नाही तर भारत फायलनमध्ये

पावसामुळे भारत-इंग्लंड सामना रद्द झाला, तर त्याचा फायदा रोहित शर्माच्या संघाला होईल. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल आणि इथे त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. खरेतर, दुसरा उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास, गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या