IND vs BAN 1st Test : भारतीय गोलंदाजांनी वाजवला बांगलादेशचा बँड, १५० धावाही करता आल्या नाहीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN 1st Test : भारतीय गोलंदाजांनी वाजवला बांगलादेशचा बँड, १५० धावाही करता आल्या नाहीत

IND vs BAN 1st Test : भारतीय गोलंदाजांनी वाजवला बांगलादेशचा बँड, १५० धावाही करता आल्या नाहीत

Published Sep 20, 2024 03:43 PM IST

India vs Bangladesh 1st Test : बांगलादेश क्रिकेट संघ चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली.

IND vs BAN 1st Test : भारतीय गोलंदाजांनी वाजवला बांगलादेशचा बँड, १५० धावाही करता आल्या नाहीत
IND vs BAN 1st Test : भारतीय गोलंदाजांनी वाजवला बांगलादेशचा बँड, १५० धावाही करता आल्या नाहीत (PTI)

जसप्रीत बुमराह याच्या धडाकेबाज गोलंदाजीपुढे बांगलादेश संघाने शरणागती पत्करली. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांत गारद झाला. जसप्रीत बुमराहने ११ षटके टाकली आणि ४.५ च्या इकॉनॉमीसह ४० धावांत ४ बळी घेतले.

बुमराहशिवाय मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. बांगलादेशसाठी अनुभवी अष्टपैलू शकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा केल्या.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ पहिल्या डावात ३७६ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात बांगलादेशची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. संघाला पहिला धक्का २ च्या स्कोअरवर बसला. 

जसप्रीत बुमराहने शादमान इस्लामला बोल्ड केले. शादमान इस्लामने २ धावा केल्या. २२ धावांवर संघाची दुसरी विकेट पडली. आकाश दीपने झाकीर हसनला आपला शिकार बनवले. झाकीर हसनने ३ धावा केल्या.

यानंतर पुढच्याच चेंडूवर आकाश दीपने मोमिनुल हकला बोल्ड केले. हक शुन्यावर बाद झाला. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने ३० चेंडूत २० धावा केल्या. सिराजने त्याला विराट कोहलीने झेलबाद केले. मुशफिकर रहीमने १४ चेंडूंचा सामना करत ८ धावांची खेळी खेळली. बुमराहने त्याची विकेट घेतली. 

यष्टिरक्षक लिटन दासने ४२ चेंडूत २२ धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याची विकेट घेतली. जडेजाने शाकिबलाही आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने ६४ चेंडू खेळून ३२ धावा केल्या.

बुमराह-आकाशदीपची घातक गोलंदाजी

बुमराहने घातक गोलंदाजी करत ४ बळी घेतले. त्याने ११ षटकात ५० धावा दिल्या. या काळात १ मेडन ओव्हरही टाकली. तर आकाश दीपने ५ षटकात १९ धावा देत २ बळी घेतले. या दोघांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. यानंतर सिराज आणि जडेजाने उर्वरित काम पूर्ण केले.

टीम इंडियाचे गोलंदाजी आक्रमण खूपच मजबूत दिसत होते. बुमराह आणि आकाश दीपसह, जडेजा आणि सिराज यांनीही चमत्कार केला. सिराजने १०.१ षटकात ३० धावा देत २ बळी घेतले. रवींद्र जडेजाने ८ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या