ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरला तेव्हा खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती. या काळ्या पट्टीवरून टीम इंडियाचे खेळाडू शोकसागरात बुडाल्याचे स्पष्ट झाले.
२६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यामुळेच भारतीय संघातील खेळाडूंनीही हातावर काळी पट्टी बांधून शोक व्यक्त केला आहे.
क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा मोठा क्रिकेटपटू किंवा देशाच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहायची असते, तेव्हा संघाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरतात. अशा परिस्थितीत हजारो मैल दूर टीम इंडियाच्या खेळाडूंनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने दमदार सुरुवात करत ६ गडी गमावून ३११ धावा केल्या.
विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरची फलंदाजी खूपच जबरदस्त होती. टॉप ऑर्डरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार खेळाडूंनी अर्धशतकी खेळी खेळली.
खेळाच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने ६८ धावांवरून आपला डाव पुढे नेला. त्याच्यासोबत स्वतः कर्णधार पॅट कमिन्स मैदानावर उपस्थित आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरात लवकर गुंडाळून फलंदाजीला उतरण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
खेळाच्या पहिल्या दिवशी गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या