IITian Baba Video : टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप मीच जिंकून दिला, 'आयआयटी'यन बाबांचा दावा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IITian Baba Video : टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप मीच जिंकून दिला, 'आयआयटी'यन बाबांचा दावा

IITian Baba Video : टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप मीच जिंकून दिला, 'आयआयटी'यन बाबांचा दावा

Jan 21, 2025 08:24 PM IST

IITian Baba MahaKumbh : आयआयटी'यन बाबाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते दावा करत आहेत, की त्यांच्यामुळेच भारताने २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.

IITian Baba Video : टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप मीच जिंकून दिला, 'आयआयटी'यन बाबांचा दावा
IITian Baba Video : टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप मीच जिंकून दिला, 'आयआयटी'यन बाबांचा दावा

IItian Baba T20 World Cup 2024 : कुंभमेळा सुरू झाल्यापासून लाखो लोक दररोज प्रयागराजला भेट देत आहेत. याच कुंभमेळ्यातील एक आयआयटीयन बाबा खूपच चर्चेत आला आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांची एक मुलाखत प्रचंड चर्चेत आली. त्यानंतर अनेक मीडिया रिपोर्टर्स त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोचत आहेत.

आता याच IIT यन बाबाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते दावा करत आहेत, की त्यांच्यामुळेच भारताने २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.

भारताने गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

वास्तविक, एका मीडिया मुलाखतीत आयआयटीयन बाबांना विचारण्यात आले की, ते क्रिकेट पाहतात का? यावर उत्तर देताना ते म्हणाले, "होय, मी खूप क्रिकेट पाहिले आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही मी भारताला विजय मिळवून दिला होता. मी वारंवार हार्दिक पांड्याला गोलंदाजी द्यावी, असे म्हणत होतो, पण रोहित शर्मा तसे करत नव्हते.

भारताने टी-20 विश्वचषक कसा जिंकला?

IITian बाबाचे खरे नाव अभय सिंह आहे, त्यांनी भारताला टी-20 विश्वचषक कसा मिळवून दिला हे सांगितले.

ते म्हणाले, की “येथे बसून तुम्हाला सिग्नल कनेक्ट करावे लागेल आणि जर तो सिग्नल लाईव्ह येत असेल, तर तुम्हाला समजले पाहिजे की ती ऊर्जा त्याच स्वरूपात येत आहे.

हीच ऊर्जा लाटांच्या रूपात टॉवरवर आदळते. आता ती ऊर्जा त्या टॉवरपर्यंत कशी पोहोचली, प्रत्यक्षात कॅमेराने ती ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतली होती. सत्य हे आहे की तुम्ही सामना लाइव्ह पाहत आहात, परंतु त्यादरम्यान माहितीमध्ये फेरफार होत आहे, ज्याला तांत्रिक भाषेत कोड-डिकोड देखील म्हटले जाऊ शकते."

भारत दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला

२००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला १७ वर्षे वाट पाहावी लागली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. हा विजय भारतीय संघासाठी अतिशय संस्मरणीय ठरला कारण एकही सामना न गमावता जेतेपदावर कब्जा केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या