१८ की १९ जानेवारी? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड कधी? राजीव शुक्ला यांनी सांगितली तारीख
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  १८ की १९ जानेवारी? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड कधी? राजीव शुक्ला यांनी सांगितली तारीख

१८ की १९ जानेवारी? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड कधी? राजीव शुक्ला यांनी सांगितली तारीख

Jan 12, 2025 08:40 PM IST

Champions Trophy 2025 : आयसीसीने १२ जानेवारीपर्यंत प्राथमिक संघ जाहीर करण्याची मुदत दिली होती, परंतु भारताने वेळ वाढवून मागितली आहे, जेणेकरून एक चांगला संघ निवडता येईल.

१८ की १९ जानेवारी? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड कधी? राजीव शुक्ला यांनी सांगितली तारीख
१८ की १९ जानेवारी? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड कधी? राजीव शुक्ला यांनी सांगितली तारीख

Champions Trophy 2025 India Squad : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आतापर्यंत अनेक देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. यामध्ये बांगलादेश, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. यानंतर आता टीम इंडियाचा संघ कधी जाहीर होणार, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. पण आता या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिले आहे. 

१८ किंवा १९ जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयची बैठक होणार आहे. 

दरम्यान, आयसीसीने १२ जानेवारीपर्यंत प्राथमिक संघ जाहीर करण्याची मुदत दिली होती, परंतु भारताने यामध्ये शिथिलता मागितली होती, जेणेकरून एक चांगला संघ निवडता येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर काही काळ हवा आहे.

१८ किंवा १९ जानेवारीला संघ निवडीसाठी बैठक

राजीव शुक्ला यांनी सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ निवडण्यासाठी १८ किंवा १९ जानेवारीला बैठक होणार आहे. आता बीसीसीआयची निवड समिती संघात कोणाला स्थान देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असेल, मात्र टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.

भारतीय संघ अ गटात पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह उपस्थित आहे. टीम इंडियाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये ५ टी-20 आणि ३ एकदिवसीय सामने होणार आहेत. 

टी-20 मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. तथापि, वनडे मालिकेसाठी मेन इन ब्लूची घोषणा अद्याप झालेली नाही. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. या टी-20 मालिकेद्वारे मोहम्मद शमी तब्बल १४ महिन्यांनंतर टीम इंडियात परतणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या