भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आपल्या खेळाडूंवर सर्व प्रकारचे निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. विचारात घेतलेले काही नियम कालबाह्य आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या मालिका किंवा स्पर्धांदरम्यान पत्नी किंवा कुटुंबीय क्रिकेटपटूंसोबत राहणार नाहीत. हा नियम बीसीसीआयने कोविड- १९ पूर्वी लागू केला होता. परंतु, नंतर तो काढून टाकण्यात आला.
इंग्लंडविरुद्ध जवळपास दोन महिने चालणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय काही नवे आणि जुने नियम लागू करू शकते. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, खेळाडूंसाठी सर्वात मोठे निर्बंध म्हणजे ते ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या स्पर्धा किंवा मालिकेदरम्यान आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवू शकत नाहीत. पत्नी किंवा कुटुंबीय जास्तीत जास्त दोन आठवडे खेळाडूंसोबत राहू शकतात. टूर किंवा इव्हेंट छोटा असेल तर कुटुंब आणि जोडीदार एकाच हॉटेलमध्ये सात दिवसांपेक्षा जास्त थांबणार नाहीत.
याशिवाय, आता सर्व खेळाडू टीम बसमधून प्रवास करतील, असे बोर्डाने सर्वांना स्पष्ट केले आहे. यामुळे संघात एकजूट येईल. कोणताही मोठा खेळाडू वेगळा प्रवास करणार नाही. टीमच्या प्रमुखाच्या पर्सनल मॅनेजरला टीम बस किंवा टीमच्या मागे धावणाऱ्या बसमध्ये प्रवास करता येणार नाही आणि त्याला व्हीआयपी बॉक्सची सुविधाही दिली जाणार नाही. याचबरोबर विमानात १५० किलोपेक्षा जास्त सामान घेऊन गेल्यास त्याची किंमत त्यांना स्वत: मोजावी लागेल, यावरही बंदी घालण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ येत्या २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. नुकतीच बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या मालिकेतून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी पुनरागमन करणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
संबंधित बातम्या