टीम इंडियाने ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी केली. या मालिकेत त्याने इंग्लंडचा ४-१ असा पराभव केला. या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे येथे झाला. यादरम्यान अभिषेक शर्माचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. त्याने पहिल्याच षटकापासून षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली. त्याने ३७ चेंडूत शतक केले.
त्याच्या खेळीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो १८ व्या षटकापर्यंत टिकला. अशा प्रकारे त्याने आपला गुरू आणि टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू युवराज सिंग याचे स्वप्न पूर्ण केले. अभिषेकने सामन्यानंतर सांगितले की, युवराज नेहमी सांगायचा की, मी १५ ते २० षटकांपर्यंत फलंदाजी करावी. ही इनिंग पाहून तो आज आनंदी होईल'.
अभिषेक शर्माने सामन्यात लक्ष केंद्रित करून फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत टिकून राहिल्यास आपण काय करू शकतो हे दाखवून दिले. अभिषेकच्या म्हणण्यानुसार, त्याने फक्त आपल्या गुरूंचे ऐकले आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला यश मिळाले.
दुसरीकडे, आपल्या शिष्याला या शैलीत फलंदाजी करताना पाहून युवराजला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. कौतुक करताना त्याने सोशल मीडियावर लिहिले की, 'अभिषेक, तू खूप छान खेळलास, मला तुला तिथे बघायचे आहे. तुझा अभिमान आहे.'
युवराज सिंगने अशी स्तुती केल्यावर अभिषेककडूनही प्रतिक्रिया आली की, चप्पलची धमकी न देता पहिल्यांदाच काही म्हटले आहे.
त्यांना माझा अभिमान आहे, मला याचा खूप आनंद आहे.' यानंतर तो पुढे म्हणाला, की ‘मी त्यांच्यासोबत ३ वर्षांपासून ट्रेनिंग घेत आहे. तेव्हापासून त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून एक खेळाडू म्हणून शंका असतील पण तू एक दिवस भारताला सामने जिंकवून देशील असे सांगितले होते. कोविडच्या काळात युवराज म्हणाले होते की, तु शॉर्ट टर्मचा विचार करू नको, मी तुम्हाला लॉंग टर्मसाठी तयार करत आहे.’
संबंधित बातम्या