रिलायन्सने आणखी एक कंपनी केली खरेदी, अनंत अंबानींना मिळाली नवीन जबाबदारी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रिलायन्सने आणखी एक कंपनी केली खरेदी, अनंत अंबानींना मिळाली नवीन जबाबदारी

रिलायन्सने आणखी एक कंपनी केली खरेदी, अनंत अंबानींना मिळाली नवीन जबाबदारी

HT Marathi Desk HT Marathi
Updated Apr 26, 2025 04:21 PM IST

अनंत अंबानी हे रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांशी संबंधित आहेत. मार्च २०२० पासून जिओ प्लॅटफॉर्म, मे २०२२ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, जून २०२१ पासून रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी बोर्डवर सक्रिय आहेत.

अनंत अंबानी
अनंत अंबानी (File PTI Photo)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याबरोबरच अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उदाहरणार्थ, कंपनीने लाभांश जाहीर केला आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रिलायन्सने ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी एका कंपनीचे अधिगृहन केले आहे.

अनंत यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ -

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एचआर, नॉमिनेशन अँड रेमोनेरेशन कमिटीच्या शिफारशीनुसार बोर्डाने १ मे २०२५पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. शेअरहोल्डर्सच्या मान्यतेने अनंत अंबानी रिलायन्समध्ये पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय भूमिकेत दिसणार आहेत.

रिलायंसच्या अनेक कंपन्यात सक्रिय -

अनंत अंबानी हे रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांशी संबंधित आहेत. मार्च २०२० पासून जिओ प्लॅटफॉर्म, मे २०२२ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, जून २०२१ पासून रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी बोर्डवर सक्रिय आहे. सप्टेंबर २०२२ पासून ते रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत. अनंतच्या अभ्यासाबद्दल बोलायचे झाले तर त्याने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

रिलायंसकडून अधिग्रहण -

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने पीएफसी कन्सल्टिंग लिमिटेडकडून कांडला जीएचए ट्रान्समिशन लिमिटेड (केजीटीएल) चा १०० टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. कांडला येथे ७६५/४०० केव्ही जीआयएस सबस्टेशनचे टर्नकी बांधकाम उभारण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजला देण्यात आलेल्या निविदा अटींनुसार हे अधिग्रहण करण्यात आले आहे.

अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर केजीटीएल रिलायन्स इंडस्ट्रीजची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल. केजीटीएलची भारतात २७ नोव्हेंबर २०२४ रोजी स्थापना झाली आणि अद्याप व्यावसायिक कामकाज सुरू झालेले नाही. हा व्यवहार जून २०२५ च्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Whats_app_banner