Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांत कधी आहे? काय आहे दिवसाचे महत्त्व... या दिवशी काय करावे, काय करू नये?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांत कधी आहे? काय आहे दिवसाचे महत्त्व... या दिवशी काय करावे, काय करू नये?

Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांत कधी आहे? काय आहे दिवसाचे महत्त्व... या दिवशी काय करावे, काय करू नये?

Dec 09, 2024 02:59 PM IST

Dhanu Sankranti 2024 : द्रृक पंचांगानुसार यावर्षी धनु संक्रांत १५ डिसेंबर २०२४ रोजी साजरी केली जाईल. या दिवसापासून खरमास महिन्याची सुरुवात होते. हिंदू धर्मात या काळात शुभ कार्यांना मनाई आहे.

धनु संक्रांत कधी आहे? काय आहे दिवसाचे महत्त्व... या दिवशी काय करावे, काय करू नये?
धनु संक्रांत कधी आहे? काय आहे दिवसाचे महत्त्व... या दिवशी काय करावे, काय करू नये?

ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतो. जेव्हा सूर्य राशी बदलतो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात. उदाहरणार्थ, जेव्हा सूर्य धनु किंवा मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हा त्याला धनु संक्रांत किंवा मीन संक्रांत म्हटले जाईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यदेव धनु राशीत निवास करतात, तेव्हा तो काळ मालमास किंवा खरमास म्हणून ओळखला जातो. या काळात सूर्यप्रकाश कमी होतो, असे मानले जाते. चांद्र दिनदर्शिकेनुसार १५ डिसेंबररोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. त्यामुळे धनु संक्रांत 15 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल आणि सूर्य 14 जानेवारी 2025 पर्यंत धनु राशीत राहील. हिंदू धर्मात या काळात शुभ कार्यांना मनाई आहे. जाणून घेऊ या, धनु संक्रांतीची नेमकी तिथी, या दिवसाचे महत्त्व आणि नियम...

धनु संक्रांत कधी आहे?

चांद्र दिनदर्शिकेनुसार रविवार, १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत संक्रमण करेल आणि १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९ वाजून ०३ मिनिटांपर्यंत मकर राशीत उपस्थित राहील.

धनु संक्रांतीचे महत्त्व?

हिंदू धर्मात धनु संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्याची राशी बदलल्याने हवामानातही बदल होत असतो. धनु संक्रांतीच्या वेळी उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू होतो. हा दिवस भगवान सूर्याच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, धनू संक्रांतीच्या दिवशी धार्मिक कार्यांमुळे घरात सुख-समृद्धी येते. धनू संक्रांतीपासून खरमाससुरू होतो आणि या दिवसापासून शुभ कामांवर बंदी घातली जाते. खरमासकाळात लग्न, साखरपुडा, मुंडन समारंभासह सर्व शुभ कार्यांना मनाई आहे.

या काळात काय करावं?

धनु संक्रांतीपासून नियमितपणे सूर्यदेवाची पूजा करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा.

या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचेही महत्त्व आहे.

धनु संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा द्यावा.

या दिवशी सत्यनारायण कथा ऐकणे लाभदायक मानले जाते.

महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

गरीब आणि गरजूंना त्यांच्या क्षमतेनुसार अन्न आणि पैसे दान करा.

या काळात काय करू नये?

खरमासाच्या काळात विद्येचा आरंभ, नामकरण, कान छेदन, अन्नपाषाण, विवाह सोहळा, गृहोपयोगी आणि वास्तुपूजन यासह कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे टाळावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner