प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आयुष्यात त्याला कधीही आर्थिक चणचण भासू नये. याबाबतीत काही लोक अतिशय नशीबवान असतात. आणि त्यामुळेच त्यांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. परंतु प्रत्येक व्यक्तीला हे समाधान लाभत नाही. आपल्या सर्वांनाच आयुष्यात चांगले-वाईट दिवस सहन करावे लागतात.परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ज्या लोकांच्या कुंडलीत 'महाभाग्य योग' असतो त्यांना आयुष्यात सर्वच क्षेत्रात सहजासहजी यश मिळते. या लोकांना कधीही आर्थिक चणचण भासत नाही. त्यामुळेच या व्यक्ती अत्यंत नशीबवान समजल्या जातात. महाभाग्य राजयोग म्हणजे काय? आणि हा राजयोग कुंडलीत कधी तयार होतो? हे आज आपण जाणून घेऊया.
'महाभाग्य राजयोग' हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय योगांपैकी एक राजयोग मानला जातो. या योगाच्या नावावरूनच त्याबाबत कल्पना येते. महाभाग्य म्हणजे महान भाग्य असलेला. हा राजयोग असलेल्या व्यक्ती नेहमीच ऐश्वर्य आणि समृद्धीत लोळत असतात. ज्या लोकांच्या कुंडलीत हा राजयोग असतो त्या लोकांना आयुष्यात जे हवे ते लगेच मिळते. त्यांना कधीही कोणत्याच गोष्टीत अपयश येत नाही. शिवाय त्यांना विविध मार्गाने आर्थिक फायदादेखील मिळतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महाभाग्य राजयोग दोन प्रकारे निर्माण होतो. पहिला प्रकार म्हणजे जेव्हा कुंडलीत सूर्य चढत्या आणि चंद्र विषम राशीमध्ये स्थित असतात (मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु किंवा कुंभ) तेव्हा महाभाग्य योग तयार होतो. दुसरा प्रकार म्हणजे चढता सूर्य आणि चंद्र पुरुष किंवा स्त्री नक्षत्रात असतात तेव्हा हा राजयोग निर्माण होतो. ज्या व्यक्तीच्या जन्मावेळी त्याच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अशी असेल त्याच्या आयुष्यात हा राजयोग असतो. हे लोक कधीही कोणत्या गोष्टीत अपयशी होत नाहीत. शिवाय एखाद्या राजासारखे आयुष्य जगतात.
ज्योतिषअभ्यासानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत महाभाग्य राजयोग असतो त्यांचे नशीब फारच शक्तिशाली असते. या लोकांना आयुष्यात अगदी कमी प्रयत्नांत मोठे यश प्राप्त होते. या लोकांना आपल्या कार्याने प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. कार्यक्षेत्रात कमी वेळेत मोठे यश यांच्या पदरात पडते. शिवाय या लोकांना आयुष्यात भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असते. धनधान्याच्या प्राप्तीमुळे हे लोक ऐषोरामी आयुष्य जगत असतात. आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींमधील सुख, आनंद या लोकांना मिळत असतात. या लोकांना आर्थिक बाबींची किंवा करिअरची चिंता नसते. कारण कोणत्याही क्षेत्रात त्यांना यश मिळतच असते. त्यामुळे कुंडलीत हा राजयोग असणाऱ्या व्यक्ती अत्यंत भाग्यवान असतात.
संबंधित बातम्या