Geeta Updesh : या दोन व्यक्ती जीवनाला देतात नवी दिशा! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात…
Published Nov 10, 2024 09:35 AM IST
Geeta Updesh In Marathi : गीता प्रत्येक माणसाला योग्य मार्ग दाखवते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि तिचे पालन करणे खूप चांगले मानले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सर्वश्रेष्ठ व्यक्तीबद्दल सांगितले आहे.
Geeta Updesh In Marathi : गीता प्रत्येक माणसाला योग्य मार्ग दाखवते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि तिचे पालन करणे खूप चांगले मानले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सर्वश्रेष्ठ व्यक्तीबद्दल सांगितले आहे.
Geeta Updesh In Marathi : गीता प्रत्येक माणसाला योग्य मार्ग दाखवते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि तिचे पालन करणे खूप चांगले मानले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सर्वश्रेष्ठ व्यक्तीबद्दल सांगितले आहे.
श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने मानवी जीवन कसे असावे या संबंधी शिकवण दिलेली आहे. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव ग्रंथ आहे जो माणसाला जगायला शिकवतो.
गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जीवनात समस्या का निर्माण होतात आणि त्यावर उपाय काय हे सांगितले आहे. श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, दोन व्यक्ती नेहमी नवीन दिशा देतात.
विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: |
निर्ममो निरहङ्कार: स शान्तिमधिगच्छति
जो मनुष्य सर्व भौतिक इच्छांचा त्याग करून लोभ, स्वत्व आणि अहंकार या भावनांपासून मुक्त राहतो, त्याला पूर्ण शांती प्राप्त होते.
गीता उपदेश
गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जीवनात दोन व्यक्ती नेहमी जीवनाला नवी दिशा देतात, एक संधी देणारे आणि दुसरे फसवणूक करणारे. या दोन व्यक्तींना कधीही विसरता कामा नये. संधी देणाऱ्याचे आभार मानले पाहिजेत, तर पुढे तीच चुक नको व्हायला म्हणून फसवणूक करणाऱ्याला लक्षात ठेवावे.
श्रीकृष्ण म्हणतात, जर माझा भक्त शांत असेल आणि माझ्या भरवशावर सर्व काही ऐकत असेल, तर लक्षात ठेवा की मी स्वतः त्याच्या मौनाला आणि त्याच्या भरवशाचे उत्तर देतो...!!
गीतेत महापुरुषांची काही विशेष वैशिष्ट्ये सांगितली आहेत. संकटात संयम, समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता हे तीन गुण सर्वसामान्यांपासून प्रत्येक व्यक्तीला खास बनवतात.
गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले की, परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाहीत. ते नक्कीच बदलतात, म्हणून माणसाने हिंमत गमावू नये.
श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार, देव कोणत्याही व्यक्तीवर कधीही अन्याय करत नाही, तो त्याला जे पात्र आहे तेच देतो.
हिंमत हरल्यावर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणीही तुमच्या सोबत असो वा नसो, देव तुमच्या सोबत आहे आणि सदैव असेल.
गीता सांगते, देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपले वागणे आणि आपली कृती आपले नशीब लिहितात.
विभाग