Geeta Updesh : गीतेच्या ५ शिकवणी ज्या सांगतील जीवनात यशस्वी कसे व्हाल! प्रत्येकाने वाचायलाच हवं
Published Feb 18, 2025 10:00 AM IST
Geeta Updesh In Marathi : जर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला श्रीकृष्णाने श्रीमद्भागवत गीतेमध्ये अर्जुनला दिलेल्या या ५ शिकवणी माहित असणे आवश्यक आहे.
Geeta Updesh In Marathi : जर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला श्रीकृष्णाने श्रीमद्भागवत गीतेमध्ये अर्जुनला दिलेल्या या ५ शिकवणी माहित असणे आवश्यक आहे.
Geeta Updesh In Marathi : जर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला श्रीकृष्णाने श्रीमद्भागवत गीतेमध्ये अर्जुनला दिलेल्या या ५ शिकवणी माहित असणे आवश्यक आहे.
Geeta Teachings In Marathi : श्रीमद्भगवद्गीतेला उपनिषदांचे सार म्हटले आहे. भगवद्गीतेमध्ये दिलेल्या शिकवणी आपल्याला योग्य पद्धतीने जीवन कसे जगायचे हे शिकवतात. जर, तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर गीतेच्या या ५ शिकवणी लक्षात ठेवा. या शिकवणी तुम्हाला केवळ करिअरमध्येच नव्हे तर वैयक्तिक जीवनातही यशस्वी होण्यास मदत करतील. हे तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून ताणतणाव टाळण्यास आणि नैराश्यात जाण्यापासून दूर ठेवण्यात देखील मदत करतील.
एखाद्या गोष्टीबद्दल अधिक ओढ
जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी, एखाद्याशी किंवा यश मिळवण्याशी खूप जोडलेले गेलेले असाल, तर हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. गीतेत, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला उपदेश केला की, जास्त आसक्ती माणसामध्ये राग आणि निराशा निर्माण करू शकते. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट मिळत नाही, तेव्हा तो रागावतो आणि निराश होतो. त्यामुळे त्याची सर्व कामं बिघडतात.
निर्भय रहा
गीतेत, कृष्णाने उपदेश केला आहे की, मनुष्याने नेहमी न घाबरता काम करावे. जर, तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयांपासून दूर जाल आणि काम पूर्ण करू शकणार नाही. म्हणूनच आपण जीवनातील समस्यांना न घाबरता तोंड दिले पाहिजे.
शंका घेण्याची सवय लावू नका
बऱ्याच लोकांना स्वतःवर विश्वास नसतो. तो नेहमी विचार करतो की मी हे काम करू शकेन का? गीतेत, श्रीकृष्ण स्वतःच्या कर्मांवर शंका घेऊ नका असा उपदेश करतात. तुम्ही कोणतेही काम करा, ते आत्मविश्वासाने करा. यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.
रागावू नका
रागावल्याने सर्व कामे बिघडतात. रागामुळे फक्त कामच बिघडत नाही, तर नातेसंबंधही बिघडतात. म्हणून, स्वतःला शांत आणि संयमी ठेवण्याचा प्रयत्न करा. निकालाचा आधीच विचार करू नका.
परिणामाचा विचार करू नका
कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा विचार केला तर ते काम योग्यरित्या होणार नाही. म्हणून, प्रथम पूर्ण प्रयत्नाने काम पूर्ण करा. त्याच्या येणाऱ्या परिणामांचा विचार करू नका. यामुळे यशाची शक्यता वाढते.
विभाग