रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २ दिवसानंतर मिळाला मृतदेह
Published Apr 25, 2025 01:08 PM IST
- रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणानंतर एका डान्सरचा नदीत बुडून मृत्यू झाला. रंग उडवल्यानंतर तो हात धुण्यासाठी पाण्यात गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणानंतर एका डान्सरचा नदीत बुडून मृत्यू झाला. रंग उडवल्यानंतर तो हात धुण्यासाठी पाण्यात गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला.
- रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणानंतर एका डान्सरचा नदीत बुडून मृत्यू झाला. रंग उडवल्यानंतर तो हात धुण्यासाठी पाण्यात गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीमच्या एका सदस्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. सौरभ शर्मा असं या २६ वर्षीय डान्सरचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गाण्याच्या चित्रीकरणानंतर लगेचच कोरिओग्राफरचा बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
पोहण्यासाठी गेला होता सौरभ -
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीजवळ शुटिगर सुरू होते. एका गाण्याचं शूट झालं होतं ज्यात रंग उडवले गेले होते. शूटिंग संपल्यानंतर सौरभ कृष्णा नदीत हात धुण्यासाठी उतरला होता. हात धुऊन तो नदीच्या खोल पात्रात पोहायला उतरला आणि जोरदार प्रवाहात वाहून गेला.
दोन दिवस चालले सर्च ऑपरेशन -
शोधमोहिमेत डान्सर न सापडल्याने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. यानंतर रेस्क्यू टीम आणि काही खासगी संस्थांनी शोधकार्यात मदत केली. मंगळवारी रात्री अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी दिवसभर त्यांचा पुन्हा शोध घेण्यात आला. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सौरभचा मृतदेह पोलिसांना सापडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजा शिवाजी हा मराठी-हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित असून यात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे.